fbpx

Wimukta Bhatkyanche Swatantrya? | विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य?

₹225

200Pages
AUTHOR :- Lakshman Gaikwad
ISBN :- 9789352200979
Order On Whatsapp

Share On :

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे गावगाड्यातल्या अस्पृश्य जातींना संविधानातला अधिकार मिळाला. ठक्कर बप्पांमुळे जंगलातल्या आदिवासींना संविधानाच्या अंतर्गत संरक्षण मिळाले. गावगाड्यात अस्पृश्य जातीना मांगवाडा, चांभारवाडा, ढोरवाडा, महारवाडा होता; तर जंगलात राहणाऱ्या आदिवासींना जंगलामध्ये राहण्यासाठी पाडा होता; पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या कोट्यवधी गुन्हेगार जमातींच्या लोकांना जंगलात ना पाडा होता ना गावगाड्यात वाडा होता. आईच्या पोटातून जन्मलेले मूल कुठल्या गावात जन्माला आले याची साधी नोंदही नव्हती. त्यांच्या विशेष सामाजिक सुधारणांसाठी काही तरतूदही नव्हती. ही स्वतंत्र भारताची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
गुन्हेगार जमातींच्या लोकांना आजही कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिले गेले नसल्याने ‘धोबी का कुत्ता न घर का ना घाट का’ अशी अवस्था देशभर विमुक्त भटक्यांची पाहायला मिळते. निरक्षर, अज्ञानी, गावकुसाबाहेर, गावगाड्यामध्ये स्थान नसलेल्या या समाजाला विकासापासून कायमचे दूर ठेवण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राने तर ‘विमुक्त भटक्या जमाती असे गोंडस नाव’ त्यास देऊन एक प्रकारची बोळवण केली आहे. त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्यापुढे अजूनही प्रश्नचिन्हच उभे आहे.

Additional information

About Author

• श्री. लक्ष्मण मारुती गायकवाड यांचा जन्म २३ – ७ – ५२ रोजी धनेगाव, लातूर येथे झाला.
• शोषित, पीडित समाजघटकांमध्ये सामाजिक परिवर्तन करणारे आणि विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी १९७८ पासून कार्यरत असलेले गायकवाड महाराष्ट्र पातळीवरील विमुक्त भटके संघर्ष महासंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतात.
• कामगार, शेतमजूर, हॉटेल बॉईज्, स्त्री मुक्ती इत्यादी चळवळीत ते सक्रीय
सहभागी असतात.
• १९८४ साली निघालेल्या विमुक्त भटक्यांच्या लातूर ते मुंबई या शोधयात्रेचे
ते संयोजक होते.
• समाजकार्य व लेखनाची आवड असलेल्या गायकवाड यांनी मुंबई येथे भरलेल्या
पहिल्या जागतिक मराठी परिषदेमध्ये दलित समाजाबद्दल विचार मांडले.
• भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारताच्या राजीव गांधी, व्ही.पी.
सिंग, पी.व्ही. नरसिंह राव या तीन पंतप्रधानांबरोबर चर्चा केली.
• भारताच्या महत्त्वपूर्ण साहित्यिकांच्या सहा लोकांच्या शिष्ट मंडळामध्ये
अभ्यासासाठी १९९४ मध्ये त्यांनी चीनचा महत्त्वपूर्ण दौरा केला.
• श्री. गायकवाड हे विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. या पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांचा पुरस्कार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पानघंटी पुणे समता पुरस्कार, संजीवनी पुरस्कार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
• 'उचल्या' या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या आत्मचरित्राचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, उर्दू फ्रेंच, बंगाली इत्यादी भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.
• याशिवाय ते राष्ट्रीय साहित्य अकादमीचे माजी ज्युरी मेंबर, सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनीचे माजी ज्युरी मेंबर (दिल्ली) आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Wimukta Bhatkyanche Swatantrya? | विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य?”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat