Description
‘ब्राह्मणांचे कसब’ हे महात्मा जोतीराव फुले यांचे एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा आणि विशेषतः ब्राह्मणांच्या इतर जातींवरील प्रभावाचा तपशीलवार ऊहापोह केला आहे. हे पुस्तक काव्यरूपात असून, समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांमध्ये जागृती करण्यासाठी लिहिले गेले आहे. या पुस्तकाद्वारे फुले यांनी समानता व सामाजिक सुधारणा यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे पुस्तक त्यांच्या व्यापक सामाजिक सुधारणा अजेंड्याचा एक भाग आहे.प्रस्तुत पुस्तकात पुढील विषयांचा समावेश आहे :जातीयतेवर आधारित शोषणावर भाष्य.ब्राह्मणांच्या धर्मवर्चस्व व प्रथा यांचा उलगडा.समाजातील अन्याय आणि विषमता यांवर उपहासात्मक टीका.शिक्षण आणि ज्ञान यांचे महत्त्वसमता आणि बंधुता यांविषयीचे विचारब्राह्मण समाजाच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह.स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि महत्त्वमहात्मा फुले यांनी त्यांच्या प्रखर शब्दांनी समाजातील अशिक्षिततेला आणि अज्ञानाला उजागर केले आहे. हे पुस्तक त्यांच्या सामाजिक क्रांतिकारक विचारांचे अप्रतिम उदाहरण आहे.महात्मा जोतीराव फुले एकोणिसाव्या शतकातील फार मोठे सामाजिक क्रांतिकारक, लेखक आणि समाज – प्रश्नांविषयी जाण असलेले समाजचिंतक होते. आजच्या महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.म. फुले यांनी आयुष्यभरात स्त्री – शूद्रातिशूद्रांची जगण्याची फरपट, बहुजन शेतकरी-कष्टकऱ्यांची दैन्यावस्था, शिक्षणाच्या अभावामुळे सामान्यांच्या वाट्याला आलेला अज्ञानाचा अंधार, मतलबी उच्चवर्णीयांचा दांभिकपणा अन् पिळवणूक यासंबंधी विद्रोही लेखन केले. अस्पृश्योद्धाराची कृती स्वत:पासून सुरू करून स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटविली.म. फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांच्यानंतर अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी पुढे नेली. त्यातील एक आहेत विदर्भातील चिखली येथील पंढरीनाथ सीताराम पाटील. या सत्यशोधकाने अथक प्रयत्नाने संशोधन करून महात्मा जोतीराव फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र लिहिले. इ.स.१९२८ साली स्वतः प्रकाशित केले. ही दुर्मीळ पहिली आवृत्ती नाशिकच्या सार्वजनिक ग्रंथालयात उपलब्ध झाली. मराठीतील हे अक्षरधन योग्य दुरुस्त्यांसह वाचकांसाठी नव्याने प्रकाशित केले आहे.- बाबा भांड
Reviews
There are no reviews yet.