Description
“ ‘थांब श्रमणा, थांब.’
त्याचे हे शब्द कानी पडताच तथागत म्हणाले, ‘मी तर थांबलो आहे अंगुलिमाल; पण आता तूदेखील थांब. हे दुष्कर्म करण्याचं आता तरी थांबव.’
अंगुलिमाल आश्चर्यानं तथागतांकडे बघू लागला. त्याला काहीच समजेनासं झालं. तथागतांना पाहून तो भारावून गेला.
तेव्हा तथागत त्याला म्हणाले, ‘बरं! असं कर, मला त्या झाडाचं एक पान तोडून दे.’
अंगुलिमालनं पटकन एक पान तोडून तथागतांना दिलं.
‘आता हे पान परत त्या झाडावर लाव,’ तथागतांनी अंगुलिमालला सांगितलं.
‘काय?’ अंगुलिमाल आश्चर्यानं म्हणाला.
तथागत शांतपणे म्हणाले, ‘होय. आता हे पान परत त्या झाडावर लाव.’
‘हे कसं शक्य आहे भन्ते. हे असं करणं शक्य तरी आहे का? झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं?’ अंगुलिमाल म्हणाला.
‘तू हे पान पुन्हा जोडू शकत नाहीस तर मग ते तोडलंसच का? याचाच अर्थ असा आहे अंगुलिमाल की, जर तू कुणाला जीवन देऊ शकत नसशील तर मग तुला इतरांचं जीवन हिरावून घेण्याचाही काही अधिकार नाही. तेव्हा सन्मार्गावर ये अंगुलिमाल,’ त्याला समजावत तथागत म्हणाले.
तथागतांचे हे शब्द ऐकून अंगुलिमालच्या अंतरात्म्यातील अहिंसक जागा झाला आणि अंगुलिमाल त्यांच्या चरणी लीन झाला.”
– प्रस्तुत पुस्तकातून
बौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील, करुणा, नैतिकता, सदाचार आणि सद्गुण आदी तत्त्वांची शिकवण देणारे हे पुस्तक सर्वांना आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.
————————————————————————————————————————-
‘‘दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.’’
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
कृ.अ. केळूसकर हे गेल्या शतकातील मोठे विचारवंत, विख्यात चरित्रकार. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी या युगपुरुषांचे ते पहिले महत्त्वाचे चरित्रलेखक.
गुरुवर्य केळूसकरांमुळेच डॉ. आंबेडकरांसारखे नेते समाजास मिळाले. जनात जनार्दन पाहणारे ते ऋषितुल्य प्रज्ञावंत होेते. मामा परमानंद, न्या. रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखणीची व विचारांची त्या काळात प्रशंसा केली.
धर्मशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र या चौफेर विषयांतील ते पंडित होते. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. ते गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते.
पुरोगामी महाराष्ट्राने केळूसकरांच्या एकूण लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हेरून मदत केली तशीच मदत केळूसकरांनाही केली. गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळेच पहिल्यांदा गौतम बुद्धांची ओळख ठळकपणे मराठी वाचकांस झाली.
‘‘गौतम बुद्धांचे चरित्र हा मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ आहे.’’
– डॉ. धनंजय कीर
Reviews
There are no reviews yet.