Description
‘ब्राह्मणांचे कसब’ हे महात्मा जोतीराव फुले यांचे एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा आणि विशेषतः ब्राह्मणांच्या इतर जातींवरील प्रभावाचा तपशीलवार ऊहापोह केला आहे. हे पुस्तक काव्यरूपात असून, समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांमध्ये जागृती करण्यासाठी लिहिले गेले आहे. या पुस्तकाद्वारे फुले यांनी समानता व सामाजिक सुधारणा यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे पुस्तक त्यांच्या व्यापक सामाजिक सुधारणा अजेंड्याचा एक भाग आहे.
प्रस्तुत पुस्तकात पुढील विषयांचा समावेश आहे :
जातीयतेवर आधारित शोषणावर भाष्य.
ब्राह्मणांच्या धर्मवर्चस्व व प्रथा यांचा उलगडा.
समाजातील अन्याय आणि विषमता यांवर उपहासात्मक टीका.
शिक्षण आणि ज्ञान यांचे महत्त्व
समता आणि बंधुता यांविषयीचे विचार
ब्राह्मण समाजाच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह.
स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि महत्त्व
महात्मा फुले यांनी त्यांच्या प्रखर शब्दांनी समाजातील अशिक्षिततेला आणि अज्ञानाला उजागर केले आहे. हे पुस्तक त्यांच्या सामाजिक क्रांतिकारक विचारांचे अप्रतिम उदाहरण आहे.
इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते.
जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे.
जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे.
जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे|
Reviews
There are no reviews yet.