Buddhaleelasarsangraha | Gulamgiri | बुद्धलीलासारसंग्रह | गुलामगिरी |

₹500

440 Pages
AUTHOR :- Dharmanand Kosambi
AUTHOR :- Jotirao Phule
ISBN :- ‎ 9789371189279

Share On :

Description

तथागत बुद्धांचे जीवन हे करुणा, प्रज्ञा आणि शांततेचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांनी मानवी दुःखाचा शोध घेतला आणि त्यावर उपाय म्हणून चार आर्यसत्ये व अष्टांगिक मार्ग यांचा उपदेश केला. त्यांचे जीवन केवळ धार्मिक प्रवास नव्हे, तर मानवी मूल्यांचे पुनर्निर्माण करणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे.
प्रख्यात विचारवंत आणि समाजसुधारक प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या उपदेशांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. साध्या, ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषेत मांडलेला हा ग्रंथ वाचकांना ज्ञानप्राप्तीच्या प्रवासात सहभागी करून घेतो.
या पुस्तकात वाचकांना…
* बुद्धांचे बालपण, राजवाड्यातील जीवन आणि वैराग्याची सुरुवात
* ज्ञानप्राप्तीसाठी केलेली तपश्चर्या
* धर्मचक्रप्रवर्तन आणि संघाची स्थापना
* समता, अहिंसा आणि बंधुभावाचा संदेश
* बुद्धांच्या महत्त्वपूर्ण उपदेशांची मांडणी
अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत अनुभवता येते.
‘बुद्धलीलासारसंग्रह’ हे केवळ वाचनासाठी नसून जीवनासाठी दिशादर्शक ठरावे, हीच त्याची खरी विशेषता आहे.

“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”
१ जून १८७३
जो. गो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddhaleelasarsangraha | Gulamgiri | बुद्धलीलासारसंग्रह | गुलामगिरी |”

Your email address will not be published. Required fields are marked *