Description
भारताचे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, शिक्षक, लेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून तमाम भारतीयांसमोर आदर्श निर्माण करणारे मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपले प्रेरणास्थान. आपल्या उत्तुंग कार्याद्वारे त्यांनी भारताला सामर्थ्य देण्यासोबतच जगाच्या इतिहासात वेगळी उंची मिळवून दिली. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी भारताला स्वयंपूर्ण बनविले. बलशाली आणि प्रगत भारत हे त्यांचे स्वप्न होते.
जिद्द, चिकाटी आणि अविरत कष्टांच्या बळावर त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखविले. आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून त्यांनी अवघे आयुष्य निरपेक्षपणे देशसेवेला वाहिले. नितळ, निष्कपट कलामांची देशातील लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ख्याती होती.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका कलामांनी अतिशय समर्पित वृत्तीने पार पाडली. राष्ट्रपती भवनात सर्वोच्चपदी असतानादेखील सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावाने त्यांनी आपुलकीचे वातावरण निर्माण केले. शिक्षक म्हणून आपली ओळख असण्याचा तर त्यांना सार्थ अभिमान होता.
प्रत्येकाबरोबर आत्यंतिक सौजन्याने वागण्याची वृत्ती, अध्यात्मावर असलेला प्रगाढ विश्वास, विचारमूल्यांवर असलेली निष्ठा, ज्ञानार्जनाशी एकरूपता अशा कितीतरी बहुविध पैलूंमुळे त्यांचा जगाच्या इतिहासावर चिरंतन ठसा उमटला आहे. रामेश्वरमसारख्या लहानशा तीर्थक्षेत्री सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कलामांनी हे सर्व साध्य केलं तरी कसं? स्वत:च्या स्वार्थाचा तसूभरही विचार न करता अहोरात्र काम करत राहण्यासाठी त्यांची मनोभूमिका कशी तयार होत गेली? यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या आयुष्याचे प्रेरणादायी चित्रण करणारे हे वेधक चरित्र
————————————————————————————————————————-
“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.