Majhi Atmakatha,Satyache Prayog

₹450

560 Pages
AUTHOR :- Babasaheb Ambedkar, Mohandas Karamchand Gandhi
ISBN :- B0BMQGRT42

Share On :

Description

“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे.
या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.

फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता.

परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे.

ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल.

वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे.
हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.’
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.
त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.

आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले.

ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.

———————————————————————————————————————-

या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही.
सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.
– महात्मा गांधी

या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझी इच्छा आहे.

या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचा उपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो.
कारण, की सांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे.

मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहे ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही.
ज्या मापाने स्वत:ला मोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:ला लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की:
मौ सम कौन कुटिल खल कामी?

जिन तनू दियो ताहि बिसरायो ऐसो निमकहरामी ।।
– महात्मा गांधी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Majhi Atmakatha,Satyache Prayog”

Your email address will not be published. Required fields are marked *