Description
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!
आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मातृत्व स्वीकारताना गर्भवतीची काळजी कशी घ्यावी व परिपूर्ण बालसंगोपन कसे असावे याची संपूर्ण माहिती असल्यास गर्भारपण व बालसंगोपनातील अडचणी दूर होऊन पालकत्वाचा पुरेपूर आनंद मिळतो.
या पुस्तकाची रचना करताना गर्भवती व बालसंगोपनाविषयी प्रत्येक मुद्याबाबत पुरेशा प्रमाणात आणि अचूक विवेचन केले आहे.
त्यामुळे प्रत्येक जोडप्यास हे पुस्तक उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आहे. घरी बाळ येणार हे नक्की झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शक पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.