Description
सत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो.
सत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे – त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत.
ओशो पुस्तकातील काही मुख्य विषय
• खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे?
• शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे.
• जीवन एक स्वप्न आहे का?
• संयमाचा अर्थ काय?
————————————————————————————————————————–
जेव्हा आपण ध्यानात जातो, आपल्या चैतन्याचा थेंब ब्रह्मात विलीन होतो, तेव्हा आपण कुठंच असत नाही. आणि जेव्हा आपण कुठंच असत नाही तेव्हा त्याच वेळी शांतीचा जन्म होतो, आनंदाचा अन् अमृताचा जन्म होतो.
आपण जोवर आहोत तोवर दुःख आहे, तोवर पीडा आहे. जोवर आपण आहोत, परेशानी आहे. आपलं असणंच अँग्विश आहे, संताप आहे. आपला अहंकारच सगळ्या दुःखाचं मूळ आहे.
जेव्हा आपण म्हणू की मी कुठंच नाही किंवा सर्वत्र आहे, त्याच क्षणी आनंदाचा उगम स्रोत सुरू होतो.
Reviews
There are no reviews yet.