Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे.
भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले.
कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे.
केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे.
हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.
————————————————————————————————————————–
व्यक्तीची वाणी आणि कर्तृत्व यामुळे त्या व्यक्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात.
आपल्या भाषणांनी जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही.
ज्या महान विभूतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणांचे संकलन म्हणजेच ‘विश्वातील महान भाषणे’ हे पुस्तक.
या पुस्तकाद्वारे आजच्या सुज्ञ वाचकांना हे सत्य जाणवेल की, इतिहासात कधी मोठ्यातला मोठा त्याग करून सत्य प्रकट करणारे निष्णात, साहसी व्यक्तिमत्त्व होते; तसेच थकल्याभागल्या लोकांच्या हृदयात विद्रोहाचे निखारे भडकविणारेही होते.
आपल्या थोड्याशा शब्दांनी राष्ट्राच्या कठीण प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची प्रेरणा देणारेही होते.
अब्राहम लिंकन, अल्बर्ट आइनस्टाइन, गॅलिलिओ गॅलिली, जॉन एफ. केनेडी, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यासारख्या पाश्चात्त्य; तसेच महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या भारतीय विभूतींच्या विचारांमध्ये एक साम्य होते.
ते म्हणजे विविध राष्ट्र, समाजातील सर्व भागांची चिंता आणि अशा राष्ट्रांच्या, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्यातील तळमळ, काळाच्या पडद्याआड गेलेल्या यातील काही व्यक्ती त्यांच्या प्रेरक विचारांमुळे आजही जिवंतच आहेत, हेदेखील एक निर्विवाद सत्यच. या सर्वांनीच दिलेला हा शांतीचा संदेश आपल्यासाठी सादर.
Reviews
There are no reviews yet.