Mahar Watan ani mahatvache kayade | महार वतन आणि महत्त्वाचे पूरक कायदे

₹250

216 Pages
AUTHOR :- Adv. Pradip Tapse Patil
ISBN :- ‎ 9789352202690

Share On :

Description

एकविसाव्या शतकामध्येही महार वतन इनामी हक्क जमिनीचे अस्तित्व कायम आहे. सदरील मिळकत महार वतन जमीन असून ही कुठल्याच जी.आर.नुसार किंवा खरेदीद्वारे हस्तांतरण होत नाही. ती फक्त 99 वर्षांच्या करारासह भाडेपट्ट्यावर देता येते. महार वतन जमिनीचे खरेदीखत जरी करून दिले असेल तरी ती जमीन वतनी असल्यामुळे हस्तांतरण होत नाही. मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या मतानुसार एखाद्या चुकीच्या बाबीसाठी मुदतीचा कायदा लागू होत नाही. त्यामुळे सदरील जमिनीवर हक्क असल्यास, खटला दाखल करण्यास उशीर झाला असे म्हणण्याची आवश्यकता नाही. कारण 50 ते 100 वर्षांनंतरही प्रकरण दाखल करता येते आणि ती जमीन महारवतनी मालकाला व वारसाला परत मिळू शकते. या पुस्तकात दिलेली याविषयीची सखोल माहिती माझ्या प्रदीर्घ वकिली व्यवसायाच्या अनुभवातून हाती लागलेली असून वाचकांसाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.

Additional information

About Author

अ‍ॅड. प्रदीप विक्रमराव तपसे पाटील विख्यात कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांनी वकिली व्यवसायाला 1997 पासून ता. केज, जि. बीड न्यायालयातून प्रारंभ केला. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे 3 जून 2002 पासून त्यांनी कामकाजास सुरुवात केली. पुणे, अहमदनगर या ठिकाणीही वकिली केली. त्यांनी विधी सल्लागार म्हणून एम.एस.एफ.सी., जिल्हा परिषद, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आदी ठिकाणी काम पाहिले असून, त्यांना सामाजिक काम करण्याची आवड आहे. अ‍ॅड. प्रदीप पाटील यांची कायदेविषयक पन्नासपेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावे – उलट तपास, प्राथमिक कायदा सल्ला, दिवाणी कायद्याची मार्गदर्शिका, फौजदारी कायद्याची मार्गदर्शिका, माहितीचा अधिकार, मुदतीचा कायदा इत्यादी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahar Watan ani mahatvache kayade | महार वतन आणि महत्त्वाचे पूरक कायदे”

Your email address will not be published. Required fields are marked *