Waiting For A Visa | Gulamgiri

₹300

176 Pages
AUTHOR :- Babasaheb Ambedkar
ISBN :- ‎ 978-9371185387

Share On :

Description

वेटिंग फॉर अ व्हिजा’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५-३६ दरम्यान लिहिलेले आत्मकथात्मक वर्णन आहे. यात त्यांनी दलित समाजाला भोगावी लागणारी जातीय अपमानाची आणि भेदभावाची कठोर वास्तवता उघड केली आहे. शीर्षक रूपकात्मकरीत्या सूचित करते की, भारतीय समाजात दलितांचा मान, सन्मान आणि स्वीकार मिळविण्याचा संघर्ष अजूनही संपलेला नाही.
डॉ. आंबेडकर बालपणीच्या अनुभवांतून सांगतात की, ‘अस्पृश्य’ ओळखीमुळे त्यांनी जीवनात मदतीचा नकार, अतोनात अपमान आणि मनावर खोलवर उमटलेली भीती अनुभवली. उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतरही त्यांना राहण्यासाठी घर नाकारले गेले, ज्यातून शैक्षणिक आणि सामाजिक भेदभावाची व्याप्ती दिसते.
वाहतूक सेवा नाकारणे, टांगेवाल्यांचा विरोध आणि अस्पृश्यतेभोवतीचे अंधविश्वास समाजातील पूर्वग्रहांची तीव्रता दर्शवतात. आरोग्यसेवेतही भेदभाव किती घातक आहे, याचे उदाहरण म्हणजे एका दलित स्त्रीला उपचार न मिळाल्याने तिचा झालेला मृत्यू.
व्यावसायिक क्षेत्रातही अपमानाची हीच परंपरा दिसते. जात सांगितल्यावर लेखनिक म्हणून काम करणाऱ्या एका भंगी युवकाचा झालेला छळ आणि नोकरीबरून पायउतार होण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, शूद्र आणि अस्पृश्यांवरील भेदभावाची मुळे इतिहासात खोलवर रुजली असून, या अन्यायाविरुद्ध लढा देणे हेच त्यांचे आयुष्यभराचे ध्येय राहिले.

“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”

१ जून १८७३
जो. गो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Waiting For A Visa | Gulamgiri”

Your email address will not be published. Required fields are marked *