Hindutva | Swami Vivekananda | हिंदुत्व | स्वामी विवेकानंद

₹470

396 Pages
AUTHOR :- Prabodhankar Thackeray
AUTHOR :- Rajiv Ranjan
ISBN :- 978-9349573789

Share On :

Description

प्रस्तुत ‘हिंदूत्व’ पुस्तक चार भागांत आहे. यात प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ओजस्वी शैलीत व परखडपणे हिंदुत्वाविषयी आपले विचार मांडलेले दिसतात. हिंदू धर्माची झालेली अवस्था आणि त्याची कारणमीमांसा केलेली दिसते. वेदपूर्वकाळापासून मुसलमानांच्या आक्रमणानंतर भारतभूमीच्या झालेल्या अवस्थेचे चिकित्सात्मक पद्धतीने वर्णन करून हिंदू धर्माच्या र्‍हासाची व अध:पाताची कारणे स्पष्टपणे मांडलेली दिसतात. त्याचबरोबर प्रबोधनकार आपल्या लिखाणातून भिक्षुकशाहीवरही जोरदार प्रहार करतात. भिक्षुकशाही सामान्य जनतेला कसं जेरीस आणते आणि स्वत:चा स्वार्थ कसा साधते, देवांच्या देवळांची निर्मिती करून त्यांना व्यावसायिक रूप कसे आणते, यांविषयी ते परखडपणे आपले विचार मांडतात. यासाठी या देशातील तरुणांनी स्वयंप्रेरणेने या बंडाच्या विरुद्ध उभे राहून त्यांच्या विचारांचा हातोडा अशा पद्धतीने चालवावा की, तो थेट देवावर आणि देवाच्या देवळावर पडेल असा आशावाद प्रबोधनकार या लेखातून बोलून दाखवितात.
प्रबोधनकार केशव ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, मराठी साहित्यिक आणि सामाजिक विचारांचे अग्रणी होते. त्यांना ‘प्रबोधनकार’ या नावाने ओळखले जाते, कारण त्यांनी समाज प्रबोधनासाठी ‘प्रबोधन’ मासिकाचे संपादन केले. प्रबोधनकार ठाकरे हेे समाजाच्या समस्यांकडे तटस्थपणे पाहत असत. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजमान्यता असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. जातीय शोषण, प्रथा-परंपरा, भोंदूगिरी यांविरुद्ध लिखाणाद्वारे आवाज उठविला. तसेच त्यांनी विविध विचारप्रधान लेख, कादंबर्‍या आणि नाटके लिहिली. त्यांच्या विचारांनी समाजवादी आणि विचारप्रवर्तक आंदोलनाला बळ दिले. समाज प्रबोधनाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला नवी दिशा दिली.

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’
जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hindutva | Swami Vivekananda | हिंदुत्व | स्वामी विवेकानंद”

Your email address will not be published. Required fields are marked *