Description
” जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्ये लिहिले.
आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्ध असताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यास त्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल.
‘असूड’ लिहिला गेला त्या वेळी देशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतः निराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्या काही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहज ध्यानात येऊ शकेल.
या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न आवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचे निदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याची दिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोह आजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे.
याचा अर्थ असा, की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जे सांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटत आल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्या पुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे
– भास्कर लक्ष्मण भोळ
————————————————————————————————————————
महात्मा जोतीराव फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्रमहात्मा जोतीराव फुले एकोणिसाव्या शतकातील फार मोठे सामाजिक क्रांतिकारक, लेखक आणि समाज प्रश्नांवि असलेले समजत होते.
आजच्या महाराष्ट्राच्या वैचारिक गीतांचा फार मोठा वाटा आहे.
म. फुले यांनी आयुष्यभरात सीतांची जपाची फरपट बहुजन शेतकरी त्यांची दैन्यावस्था शिक्षणाच्या अभावामुळे सामान्यांच्या वाट्याला आलेला अज्ञानाचा अंधार मतलबी उच्चवर्णीयांचा दांभिकपणा अन् पिळवणूक यासंबंधी विद्रोही लेखन अस्पृश्योद्धाराची कृती स्वतःपासून श्रीशिक्षणाची ज्योत पेटविली.
म. फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा यांच्यानंतर अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी पुढे नेली, यातील एक आहेत विगांतील चिखली येथील पंढरीनाथ सीताराम पाटील.
वा सत्यशोधकाने अथक प्रयत्नाने संशोधन महात्मा जोतीराव फुले दांचे मठीतील पहिले विस्तृत चरित्र लिहिले.
इ.स. १९२८ साली स्वतः प्रकाशित केले. ही दुर्मीळ पहिली आवृत्ती नाशिकच्या सार्वजनिक ग्रंथालयात उपलब्ध झाली.
मराठीतील हे अक्षरधन वाचकांसाठी नव्याने प्रकाशित केले आहे.
Reviews
There are no reviews yet.